• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

‘भारत माझा देश आहे’ या भावनेतून तरंगिनी ग्रुपकडून पूरग्रस्तांना आर्थिक मदत – नागभीड तहसीलदार प्रताप वाघमारे यांना धनादेश सुपूर्द

ByRoshan Khankure

Oct 4, 2025
Spread the love

अशाच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत, गेल्या अनेक वर्षांपासून सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘तरंगिनी रास गरबा ग्रुप’च्या वतीने पूरग्रस्त बांधवांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. या ग्रुपतर्फे तीन हजार रुपयांचा धनादेश नागभीडचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

“भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत” — या प्रतिज्ञेतील भावनेतूनच पूरग्रस्त भाऊ-बहिणींना मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्य असल्याचा संदेश या छोट्याशा मदतीद्वारे ‘तरंगिनी’ ग्रुपने दिला आहे.

या प्रसंगी तहसीलदार प्रताप वाघमारे आणि नायब तहसीलदार कावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तरंगिनी ग्रुपतर्फे प्रिया लांबट, भाविशा पटेल, आरती टहलानी, रोमी कटारे, गणेश नागापुरे, वैभव पिसे, पराग भानारकर, प्रणय दरवरे, आणि निलेश मिसार आदी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *